Solar Policy
sakal
नाशिक: राज्य महावितरण कंपनीने नुकताच धोरणात्मक बदल करीत निवासी सोलर क्षमतेची मंजुरी बारा महिन्यांच्या सरासरी वीज वापरावर आधारित मर्यादित केली आहे. या निर्णयाने पंतप्रधान सूर्यघर योजनेंतर्गत राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक प्रभावित होणार आहेत. यामुळे राज्यातील सोलर पॉवरचा विकास थांबणार असून, पंतप्रधानांच्या सूर्यघर योजनेवरही गंभीर परिणाम होईल, त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर, सोलर असोसिएशन आणि उद्योग प्रतिनिधींनी केली आहे.