
Nashik Agriculture News : विविध आपत्तीमुळे मोठे नुकसान झाल्याने मागील वर्षीच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १ लाख २६ हजार हेक्टरवर पिक घेणाऱ्या सोयाबीन व कापूस उत्पादकांना सुमारे ६५ कोटींच्या अर्थसहाय्याचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना या मदतीची लॉटरी लागणार आहे. मागील वर्षी दुष्काळ तसेच घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे खरिपात मोठे नुकसान झाले होते. (5 lakh farmers will get 65 crore from soybean and cotton farmers will get 5 thousand hectares )