
नाशिक : अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेंतर्गत ४८ लाख ५० हजार रुपये कर्ज २०२४-२५ मध्ये गरजूंना वाटप झाले आहे. महाराष्ट्रात दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाजात मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे.