

नाशिक : एरवी रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने आजार बळावतो; परंतु ‘जीबीएस’मध्ये (गुईलेन बॅरे सिंड्रोम) शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रमाणापेक्षा वाढतात आणि त्यामुळे एकापेक्षा अनेक आजार बळावतात. पुण्यात ‘जीबीएस’मुळे एकाचा बळी गेला असून, शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक शहर- जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण नसला, तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे असून, लक्षणे दिसू लागताच वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.