

नाशिक : आदिवासी उपयोजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीतून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये काय बदल घडला, याचा अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. ही समिती पेसा क्षेत्रातील गावांना भेटी देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या सहा सदस्य समितीने बुधवारी (ता. २९) आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेत पेसा कायदा आणि पेसा पाच टक्के अबंध निधीच्या अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली.