

नाशिक : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट घेत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पत्रव्यवहार केला. या वेळी नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मंत्री वैष्णव यांनी दिली. दरम्यान, रेडिओ दुर्बिणीमुळे ९० किलोमीटरपर्यंत रेल्वेचे अंतर वाढण्याची शक्यता आहे.