

नाशिक : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली आहे. समितीच्या मान्यतेअभावी विकासकामांना ब्रेक लागला आहे. तसेच सन २०२५-२६ च्या जिल्हा वार्षिक आराखड्याला मान्यतेची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या आठवड्यात शासनाने जिल्हास्तरीय पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. पण, ही घोषणा होताच नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली.