

दिंडोरी : जिल्ह्यात कमी झालेली थंडी पुन्हा परतली असून, तापमान दहा ते बारा अंशाच्या दरम्यान घसरले आहे. या थंडीमुळे द्राक्षपिकांना मोठा धोका निर्माण झाला असल्याने द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त आहेत. याचा परिणाम उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. कडाक्याच्या थंडीचे वातावरण गहू, हरभरा व इतर रब्बीच्या काही पिकांसाठी फायदेशीर असले तरी द्राक्षाच्या पिकांना मात्र हे वातावरण तोट्याचे ठरणारे आहे.