
Nashik News : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने हनुमाननगर येथील २१ नंबर चारी जवळ कालवा फुटण्याचा शक्यता असल्याने दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न परिसरातील शेतकरी उपस्थित करत आहे. त्यामुळे तत्काळ यावर उपाय करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी करत अधिकारीच मुख्यालयी राहात नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नसल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (Fear of canal bursting near Hanuman Nagar in farmer)