

नाशिक : मकर संक्रांत म्हटले, की सर्वांना पतंगाची आठवण होते. पण आनंदाच्या भरात पतंग उडवताना आपण दुसऱ्यांना किती दुःख देतो, नायलॉन मांजामुळे असंख्य पशू-पक्ष्यांनी जीव गमविल्याच्या अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडल्या आहेत. त्यामुळे यापुढे ‘आम्ही नायलॉन मांजा वापरणार नाही आणि कुणी वापरत असेल तर त्यालाही वापरु देणार नाही’ अशी प्रतिज्ञा घेत साडेचार विद्यार्थ्यांनी नायलॉन मांजाविरोधी मोहिमेत सहभाग घेतला.