नाशिक- संततधारेमुळे रविवारी (ता. ६) गंगापूर, दारणासह तब्बल १४ धरणांमधील विसर्गात वाढ करण्यात आली. यंदा गोदावरी नदीला तिसऱ्यांदा पूर आला असून, गोदाघाट पाण्याखाली गेला. दारणा नदीही दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.