
नाशिक : शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत. बुधवारी (ता.२०) मतदान आणि शनिवारी (ता.२३) मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी २० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दरम्यान १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले आहेत. (Injunction issued in Commissionerate limits due to election in city )