

नाशिक : चैनस्नॅचिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितला सोडविण्यासाठी इराणी टोळीच्या जमावाने अंबिवली रेल्वे स्टेशनवर पोलिसांवर हल्ला करीत संशयिताला पळून नेल्याचा प्रकार घडला. या टोळीने नाशिकसह राज्यात अनेक ठिकाणी चैनस्नॅचिंग केल्याचा संशय असून नाशिक शहर गुन्हे शाखेची पथकेही या संशयितांच्या शोधासाठी ठाण्याकडे रवाना झाली आहेत. शहरात दोन दिवसापूर्वी एकाच दिवशी सात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत खेचून देण्याच्या घटना घडल्या होत्या.