

नाशिक : केंद्र सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात सक्षमपणे अंमलबजावणी केल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची पंतप्रधान एक्सलन्स अॅवॉर्डसाठी निवड झाली आहे. या पुरस्काराबद्दल ‘सकाळ’ने जिल्हाधिकारी शर्मा यांच्याशी संवाद साधला. या वेळी हा पुरस्कार जिल्ह्याचा असून, सर्व शासकीय विभागांनी एकत्रित केलेल्या प्रयत्नांमुळे यश लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुरस्कारामुळे जबाबदारीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.