
संपत ढोली ः सकाळ वृत्तसेवा
सिन्नर : खरीप हंगामात कमी दिवसांत जास्त उत्पन्न देणारे कांद्याचे नवीन वाण विकसित करण्यात नाशिकच्या राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्राला यश आले आहे. तब्बल १० वर्षे त्यासाठी संशोधन सुरू होते. विशेष म्हणजे भारतातील कांदा उत्पादक कोणत्याही राज्यात याचे उत्पादन घेता येणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या वाणाला मान्यता दिली असून, लवकरच त्यास नाव देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विशेष बैठक होईल.