

नाशिक : जिल्ह्यात सलग दोन दिवस पडलेल्या मॉन्सूनोत्तर अनपेक्षित पावसामुळे नाशिक व दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागांसह तब्बल ३२७ हेक्टरवरील भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात या नुकसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील ६३ गावांमधील ६७५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची यात नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. ४) व गुरुवारी (ता. ५) मॉन्सूनोत्तर अनपेक्षित पावसाने अचानकपणे हजेरी लावली.