Nashik Rain Crisis: पाऊस न झाल्याने भीषण चाराटंचाई! निफाड तालुक्यातील ऊसाला वाढली मागणी

A tractor carrying sugarcane straw to feed the animals
A tractor carrying sugarcane straw to feed the animalsesakal

Nashik Rain Crisis : पावसाचे जवळपास तीन महिने संपले असून, अद्याप नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने अनेक तालुक्यांमध्ये खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पशुपालकांनी साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांत घास व गवत भरण्यासाठी पाणी न राहिल्याने निफाड तालुक्यातून चाऱ्यासाठी ऊसाला मागणी वाढली आहे. (Nashik Rain Crisis Scarcity of fodder due to lack of rain Increased demand for sugarcane in Niphad taluka)

नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खरीप हंगामातील मका, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. अनेक ठिकाणी मनुष्य व जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही.

जिल्ह्यात भीषण चाराटंचाई निर्माण झाली आहे. येवला, चांदवड, मनमाड, सिन्नर आदी ठिकाणचे पशुपालक चाऱ्यासाठी निफाड तालुक्यातून ऊस घेऊन जात आहेत. साधारणपणे चार हजार ते सहा हजार रुपये गुंठ्याप्रमाणे ऊस विकला जात आहे.

दररोज तालुक्यातून शंभरच्या आसपास ट्रॅक्टर भरून जात आहेत. पशुपालकांकडील साठवून ठेवलेला कोरडा चारा संपला असून, हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास, मका, खोंडे आदींना भरण्यासाठी पाणी नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A tractor carrying sugarcane straw to feed the animals
Nashik Rain Crisis: तुषार सिंचनाद्वारे पिके वाचविण्याची धडपड! पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने दुग्ध उत्पादनावरही या दुष्काळाचा परिणाम भविष्यात दिसून येणार आहे.

त्याचप्रमाणे अजून काही काळ वेळेवर पाऊस न झाल्यास तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसाची विक्री होईल व गाळपासाठी कारखान्यांना ऊस मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

"जूनमध्ये पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, गवत, खोडे आदीची पेरणी करता आली नाही. त्यामुळे चाराटंचाई निर्माण झाली आहे. हिरवा चारा म्हणून लागवड केलेले गवत, घास पाण्याअभावी वाळले आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील ऊस विकत आणून पशुधन जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे."

-पोपट काळे, पशुपालक, रेडगाव

"पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरी जोरदार पाऊस झालेला नाही. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपातील पिके पूर्णतः वाया गेली असून, पाऊस झाला तरी खरीप पिकाना फायदा होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून खरिपातील पीक विम्याची रक्कम देणे सुरू करावे. पशुधनाच्या संख्येनुसार शेतकऱ्याला चारा उपलब्ध करून द्यावा." -राजेंद्र बोरगुडे, संचालक, बाजार समिती, लासलगाव

A tractor carrying sugarcane straw to feed the animals
Maharashtra Rain Crisis : राज्यातील 216 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा अधिक पावसाची हुलकावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com