Nashik Rain
sakal
नाशिक: जिल्ह्याला बुधवारी (ता. १८) दुपारनंतर ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. काढणीला आलेला गहू, कांदा तसेच भाजीपाला पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास एक हजार हेक्टरवरील पिकांना या अवकाळीचा फटका बसला आहे.