निफाड- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज अतिशय महत्त्वाची असल्याने दिवसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत असून, लवकरच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.