नाशिक- आगामी सिंहस्थाचे नियोजन अद्यापही कागदावर रेंगाळत असल्याने २८ महिन्यांवर आलेल्या कुंभमेळ्याचे भवितव्य निधीअभावी अधांतरी दिसत आहे. कायमस्वरूपी व दीर्घकाळ चालणाऱ्या मलनिस्सारण केंद्रे, नऊ पुलांचे बांधकाम, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पांसाठी जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे.