Onion
sakal
चांदवड: आखातातील युध्दामुळे कांदा उत्पादक पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन खर्चही परत येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. बाजारभावातून केवळ काढणी आणि वाहतूक खर्च भागतो; मात्र बियाणे, खत, औषधे, मजुरी, सिंचन, लागवडीवर मूळ खर्च पूर्णपणे बुडत आहे.