येवला- नाफेडची कांदा खरेदी करण्यासह निर्यातशुल्क हटविल्याच्या घोषणा झाल्या असल्या तरी वास्तवात उन्हाळ कांद्याच्या भावात मात्र वाढ न होता घट सुरू आहे. सातत्याने भावात घसरण होऊन ८०० ते ९०० रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे. येथे शनिवारी (ता. ३) गोल्टी कांद्याला केवळ १५२ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाल्याने राजापूर येथील शेतकऱ्याने संतापून कांदा घरी नेऊन शेळ्यांपुढे टाकत संताप व्यक्त केला.