नाशिक- केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन संस्थांच्या माध्यमातून प्रत्येकी दीड लाख टनांची खरेदी करणार आहे. कांदा खरेदीसाठी २८ जुलैपर्यंत अंतिम मुदत असली तरी खरेदीला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.