येवला- सरकारी काम अन् दहा महिने थांब या उक्तीचा प्रत्यय पावलोपावली येत असतो. शासनाने दोन वर्षांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान दोन वर्षांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक अडचणीत अडकलेले तालुक्यातील एक हजार ६८२ शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या मदतीचा प्रस्ताव पणन विभागामार्फत मंत्रालयात पडून असल्याचे कळते.