येवला- निफाड व येवला तालुक्यांत शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेले पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन अंदरसूलपर्यंत पोहोचले आहे. आवर्तनातून शेतीसह मनमाड, येवला, ओझर आदी पाणी योजनांसाठी देखील पाणी देण्यात येणार आहे. टंचाई व उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कालव्यातून हजारो डोंगळे टाकून पाण्याची चोरी होती. ही पाणीचोरी थांबविण्याचे पालखेड प्रशासनापुढे आव्हान असून, यात लक्ष घालण्याची मागणी लाभधारक शेतकरी करत आहेत.