PM Kisan e-KYC mandatory before June 30
esakal
मालेगाव : केंद्र सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून ई-केवायसी (e-KYC) करून घेतली जात असून, ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक (PM Kisan e-KYC mandatory before June 30) आहे. नाशिक जिल्ह्यातील ९९ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.