नाशिक: जिल्ह्यातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांच्या तत्काळ मदतीसाठी ‘रक्षक एआय’ ही नावीण्यपूर्ण प्रणाली सुरू करण्यात आली असून, या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांसह परजिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात येणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. रक्षक एआय उपक्रमाचे लोकार्पण जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.