नाशिक- नाशिकमध्ये तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णता जाणवत आहे. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यातच शहरातील वेगवेगळ्या भागातील वीजपुरवठा काही कारणास्तव बंद होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. खंडित झालेला पुरवठा काही मिनिटांतच पूर्ववत होत असला तरी नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडथळे निर्माण होत आहेत.