नाशिक- गरोदर मातेला वेळीच रुग्णालयात पोहचणे, प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीतून माता-शिशूला वाचविणे आदी विविध समस्या कधीकाळी उद्भवत होत्या. आज आधुनिक आरोग्य सुविधांमुळे हे प्रमाण आटोक्यात येत असले, तरी प्रसूतीपूर्व आणि त्यानंतरच्या काळातही माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. सुदृढ राहण्यासाठी दोघांच्या सकस आहाराला प्राधान्य देण्याची आवश्यकता तज्नी व्यक्त केली.