वणी- चैत्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ७) आदिमाया सप्तशृंगीच्या भाविकांच्या उपस्थितीवर वाढत्या उष्णतेच्या पाऱ्याचा परिणाम जाणवला. दुसरीकडे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांतील हजारो खानदेशवासी पदयात्रेकरू आग ओकणाऱ्या सूर्याची तमा न बाळगता गडाच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. गडापासून १०० ते १५० किलोमीटरपर्यंत भाविक दाखल झाले आहेत.