Dr Sachchidanand Shevde
sakal
नाशिक: मूळ वाल्मीकी रामायण न वाचता ‘व्हॉट्सॲप विद्यापीठा’तील किंवा रामायणावर आधारित हलक्या-फुलक्या कथा-कादंबऱ्या वाचून वाचकांचा बुद्धिभ्रम होण्याची दाट शक्यता असते. एवढेच नाही, तर रामायण आणि महाभारतासारख्या पारंपरिक ग्रंथांवर आघात करून, त्यांची मोडतोड करून कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले जात असल्याचा टोला डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लगावला.