Student
sakal
नाशिक: राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवारी जिल्ह्यातील ३९३ केंद्रांवर पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी दोन सत्रांत परीक्षा दिली. यात पाचवीच्या परीक्षेस ७८६, तर आठवीच्या ६५८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. दुसऱ्या सत्रातील बुद्धिमत्ता चाचणीच्या पेपरमधील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त असल्याने हे प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागला.