Alka Darade
sakal
नाशिक: आज समाजमाध्यमे कितीही प्रगत झाली असली, तरी लोककला मागे पडता कामा नये. दंतकथा, लोककथा आणि लोकपरंपरांच्या माध्यमातून सामाजिक भान आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य जतन करणे अत्यावश्यक आहे. केवळ काल्पनिक लेखन करून भागणार नाही; चार भिंतींच्या आत दडलेली संस्कृती टिकवण्यासाठी समाजाने सामूहिकरीत्या पुढे येणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्राची लोककला जिवंत राहील, असे ठाम मत ज्येष्ठ लेखिका अलका दराडे यांनी शनिवारी (ता. १७) येथे व्यक्त केले.