नाशिक: शिव पाणंद रस्ते चळवळीअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते व शेतांमधून जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणे दूर करताना या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहेत. शासनाने त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली असून, यामुळे गावपातळीवरील वाद संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.