सिन्नर- दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना आता तर ४० अंशापर्यंत तापमान गेले आहे. शेकडो वर्षांनी तापमानात एवढी वाढ झाल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यामध्ये डोळे दुखणे, डोके दुखणे, ताप येणे, चक्कर येणे, डोळ्यातून पाणी येणे, खाज येणे अशा प्रकारची लक्षणे असलेली रुग्णसंख्या काही दिवसांपासून वाढली आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याने घामाच्या धारांनी त्रस्त झालेल्या सिन्नर करा ना वाढत्या तापमानामुळे डोळ्यांच्या व्याधींचाही सामना करावा लागत आहे.