नाशिक- नाशिक महानगर विकास प्राधिकरणाकडे (एनएमआरडीए) विविध प्रकारची आरक्षणे टाकून त्या जागा संपादित करण्यासाठी पुरेसा निधी नसल्याने त्या गावांमधील शासकीय जमिनी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर व निफाड या सहा तालुक्यांमधील १९० गावांतील १३ हजार ५४४ हेक्टर जागा वर्ग केली जाणार आहे. या माध्यमातून गावांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होईल.