नाशिक- स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०२५’ तपासणी होणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर, परिसरातील स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्ती तसेच ग्रामस्थांची मानसिकता व सहभाग यावर आधारित गुणांकन करण्यात येणार आहे.