

नाशिक - जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा अवघ्या ४८ तासांत झपाट्याने वाढून ६८ टक्क्यांवर पोहोचला आहे. दारणा धरणही निम्मे भरले असून जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमधील एकूण पाणीसाठा ३५ टक्क्यांवर पोहोचल्याने पाणीटंचाईच्या चिंतेत काहीसा दिलासा मिळाला आहे.