mahendra ekbote and amit shimpi
sakal
नाशिक - मृत्यूपूर्वीच आपल्या मालमत्तेची आपल्या वारसांमध्ये विभागणी करून दिल्यास भविष्यात वितुष्ट येण्याऐवजी गुण्यागोविंदाने संपूर्ण कुटुंब एकत्रित राहून आनंद राहतो. याच उद्देशाने ॲड. महेंद्र एकबोटे यांनी सुरू केलेल्या चळवळीला यशच आले नाही तर त्यांच्या कामगिरीची दखल इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. एकाच दिवशी एकाच कुटुंबांतील आजी, मुलगा आणि नातू या तीन पिढ्यांतील सदस्यांनी आपले मृत्युपत्राची नोंदणी केल्याचा विक्रम केला आहे.