NSK26H29850
जळगाव : स्वच्छता सेवा अभियानातंर्गत गावात स्वच्छता करताना नागरिक व कर्मचारी.
-------------------
जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियानाला सुरवात
------
लोकचळवळ म्हणून अभियान राबविण्याचे सीईओंचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे. याची सुरवात गुरुवारपासून (ता.१७) जिल्ह्यात झाली आहे.
‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही यावर्षीच्या अभियानाची संकल्पना आहे. अभियानाच्या कालावधीत गावांमधील अस्वच्छ व अडचणीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाईल. यानंतर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, शाळा- महाविद्यालयांत स्वच्छता ज्ञानयात्रा, सफाईमित्र व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व सन्मान शिबिरे, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरणाबाबत घरोघरी जनजागृती, ‘वेस्ट टू वेल्थ’ व ‘वेस्ट टू आर्ट’ यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नागरिकांना प्रोत्साहित करा
ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून अभियानाचे नेतृत्व करावे. नागरिकांना अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देशही करिश्मा नायर यांनी दिले आहेत.
लोकचळवळ म्हणून राबवा
स्वच्छतेसाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहती. गावागावांतील जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान लोकचळवळ म्हणून राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे. शिवाय शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळांमधून स्वच्छता ज्ञानयात्रा व जनजागृती फेऱ्यांमध्ये पुढाकार घ्यावा. सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट व युवक मंडळांनी श्रमदान व स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही केले.