नाशिक- शहरातील वाहतुकीच्या बेशिस्तपणाने कळस गाठला आहे. विस्कळित आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यातच रस्त्यालगत आणि वाहतूक सिग्नलजवळच विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीत आणखीच भर पडते आहे.