Well
sakal
अमळनेर - तालुक्यातील इंद्रापिंप्री व धार येथील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला, तर शहरातील अमलेश्वरनगर मधील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
इंदापिंप्री येथील शेतकरी बन्सीलाल भटा पाटील (वय-५५) रविवारी (ता. १४) दुपारी अडीचच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होते. ते कावपिंप्रीचे विठ्ठल निंबा पाटील यांच्या विहिरीजवळ गेले असता, अचानक तोल जाऊन ते विहिरीत पडले. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.