नाशिक- महावितरणच्या सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना चांगली व अखंडित वीज सेवा देणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.त्याचबरोबर दिलेल्या सेवेची १०० टक्के वसुली व थकबाकी दरमहा वसूली करणे सुद्धा अत्यावश्यक आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात वीज ग्राहकांना दिलेल्या प्रत्येक युनिटच्या वीज देयकाची वसुली अत्यावश्यक असून वीज ग्राहकांना अखंडित वीजसेवा देण्यासाठी वीजबिल वसुलीला पर्याय नसल्याचे महावितरणाचे कार्यकारी संचालक (वितरण) दत्तात्रय पडळकर यांनी केले.