Bhushan Gavai
sakal
नाशिक: कला, साहित्य जोपासायची असेल तर राजाश्रयाशिवाय पर्याय नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठी भाषा पत्रव्यवहारासाठी वापरली गेली. महाराजांनी कलाकारांचा सन्मान केला; तर राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात मराठी साहित्य, नाट्य परंपरेला राजाश्रय मिळाला होता. त्यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचवायची असेल तर अशा संमेलनाची गरज असल्याचे अधोरेखित करीत मराठी भाषेला आजही राजाश्रयाची गरज असून, त्याशिवाय तिचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.