वावी- मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे थकीत असलेल्या वीजबिलाच्या वसुलीसाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावीसह अकरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा दोन आठवड्यांपासून खंडित आहे; तर उर्वरित योजनांच्या वीजबिल वसुलीसाठी ‘महावितरण’कडून पाठपुरावा करण्यात येत असून, वीजबिल न भरल्यास कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार आहे.