Wildlife
sakal
नाशिक: वाढती उष्णता आणि खाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे वन्यजीव त्यांच्या अधिवासातून माणसांची वस्ती गाठत आहेत. पानगळ होत असल्याने फुले, पाने तसेच फळे अधिक न मिळाल्याने माकड, वानर, मोर आणि इतरही वन्यजीव शहराकडे येत आहेत. खाण्याची कमतरता असली, तरी तहान भागविण्यासाठी अधिवासात पाणवठे असल्याने शक्यतो त्यासाठी वन्यजीव शहराकडे जात नाहीत, अशी माहिती वन खात्याने दिली.