
SAKAL Impact : मुंबई व उपनगरांना पाणीपुरवठा व बी पाॅइंट वीजनिर्मिती केंद्राला पाणी पुरविणाऱ्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत प्रसिद्ध झाले.
त्याची दखल घेत पाटबंधारे विभागाने भगदाड बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. (work of decommissioning canal of Vaitarna Dam is underway nashik news)
वैतरणा धरणाच्या मुख्य भिंतीलगतच्या जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती करून बाहेर पडलेले पाणी कालव्याद्वारे थेट बी पाॅइंट वीजनिर्मितीसाठी जाते व त्यातून बाहेर पडलेले पाणी वैतरणा नदीपात्रातून मुंबई व उपनगरांना पुरविले जाते.
दोन वेळा वीजनिर्मिती करून बाहेर पडलेले पाणी मुंबई शहराला पाणीपुरवठ्यासाठी दिले जाते. इतक्या महत्त्वाचा कालवा वारंवार फुटतो. त्याला भगदाडे पडतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नाशिक जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा मर्यादित आहे.
पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी जपून वापरावे लागत आहे. कालवा फुटून पाणी वाया जाणे योग्य नाही. भविष्यातील पाणीटंचाई डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
मुंबई महापालिका व पाटबंधारे खाते धरणाच्या व कालव्याच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही कालव्याला वारंवार भगदाड पडून पाणी व पैसा विनाकारण वाया जातो, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.