येवला- अवर्षणप्रवण, दुष्काळी अन् टँकरग्रस्त असलेल्या तालुक्यात प्रत्येक उन्हाळा टँकरशिवाय जाऊच शकत नाही, अशी स्थिती आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला असला तरी अर्ध्या तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. ८ मार्चपासून तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.