Traffic Rule
sakal
येवला: येवला- मनमाड- मालेगाव रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही घडत आहेत. याविरोधात लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सातत्याने आवाज उठविल्यामुळे प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिसूचना निर्गमित करत २४ मार्चपासून या महामार्गावर फक्त रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत अवजड वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवसा अवजड वाहतूक बंद राहून वाहतूक कोंडी थांबणार आहे.