environmental campaign
sakal
येवला: माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याने माझी वसुंधरा ५.० या अभियानात येवला नगर परिषदेने राज्यस्तरावर सहावा क्रमांक, तर विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालिकेने ७५ लाखांचे मानाचे बक्षीस मिळविले. ही कामगिरी संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद ठरली आहे, असे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सांगितले.